पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशातील सुमारे तीन महिने दोन दिवसांचा मुक्काम सोमवारी (ता. २८) हलविला. पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागातून माघारी फिरत मॉन्सून वाऱ्यांनी परतीच्या प्रवासाला सुरूवात केली. बुधवारी (ता.३०) दिल्लीसह देशाच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार मॉन्सून १७ सप्टेंबर रोजी माघारी फिरणे अपेक्षित होते. मात्र यंदा तब्बल ११ दिवस उशीराने मॉन्सूनने वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. बुधवारी (ता.१८) वाऱ्यांची बदललेली दिशा, हवेतील आलावा (आर्द्रता) कमी झाल्याने मॉन्सूनने संपुर्ण पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमालयाचा पश्चिम भागासह राजस्थानच्या आणखी काही भाग, उत्तर प्रदेशच्या काही भागातून माघार घेतली आहे. आणखी दोन ते तीन दिवसात उत्तर प्रदेश, राजस्थानसह मध्य प्रदेशच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *